मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सर्व उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि डॉ. प्रज्ञा राजीव सावंत यांचा समावेश आहे.
पक्षाच्या वतीने या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून ही फळी विकास, सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसार हे सर्व उमेदवार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रभावी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
यासंदर्भात भाजपचे चिटणीस संतोष आनंदी शिवराम जनाठे यांनी प्रतिक्रिया देताना, “प्रत्येक उमेदवाराने विकासाच्या वाटचालीत सक्रिय भूमिका बजावून जनतेचा विश्वास अधिक बळकट करावा,” असे म्हटले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
